Saturday, 30 May 2020

लोकशाहीसाठी आजची पत्रकारिता

      "लोकशाहीसाठी आजची पत्रकारिता"


       निरोगी लोकशाही घडविण्यात माध्यमं महत्त्वाची भूमिका बजावतात. माध्यमं आपल्याला जगभरात होणार्‍या विविध आर्थिक, सामाजिक, राजकीय, आंतरराष्ट्रीय क्रियाकलापांबद्दल जागरुक करण्याचं काम करतं. 1780 साली जेम्स आॅगस्ट  हिकीज यांच्या "हिकीज गॅझेट"  ने भारतात वृत्तपत्रांचा पाय रोवला. त्यावेळी पत्रकारिता हा धर्म होता, मात्र आजच्या पत्रकारितेचा उघडपणे धंदा झालेला दिसतोय. स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्रं ही बहुतांशी 'मतपत्रे' होती. अग्रलेख हे पूर्वीच्या वृत्तपत्रांचे वैभव होते. आणि ते निपक्षपाती व तथ्यात्मक असत. मात्र आज माध्यमं विविध प्रकारच्या बातम्या मसालेदार आणि अधिक आकर्षक सादर करण्यावर भर देते. 

        आज माध्यमांत खूप बदल झालाय. माध्यमं ही उघड - उघड जातिकेंद्रित, पक्षकेंद्रित, व व्यक्तिकेंद्रित झाली आहे. पत्रकारितेच्या नीतीशास्त्रानुसार कोणत्याही राजकीय, सामाजिक, धार्मिक बाबतींत माध्यमांचीं भूमिका Constant असली पाहिजे. मात्र, आजच्या माध्यमांना आपली नीतीमुल्य व तत्वांचा विसर पडलेला दिसतोय. सद्यच्या वास्तविक परिस्थितीत राजकारणी व उद्योगपतींनी माध्यमांवर कब्जा मिळवायला सुरू केलंय. ते आपली सत्ता आणि पैशाच्या बळावर मीडियाला खरेदी करु पाहताय, त्यावर आपला हक्क जमवताय.  आणि हे काम ते पद्धतशीरपणे हळूहळू पाठीमागून करताय. आजच्या स्थितीला राज्यसभेमध्ये अधिकतर लोक ही Industrialization मधून belong करतात. आणि या धनाढ्य लोकांनी मीडियाच ताब्यात घ्यायला सुरुवात केलीय. 

           प्रत्येक वृत्तसंस्था, माध्यमं यांना स्वतः ची काही विचारप्रणाली असते, आचारसंहिता असते.मात्र हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभच मोडकळीस पडण्याच्या वाट्याला आल्याने या माध्यमांची सापेक्ष भूमिका आज वास्तवात राहिलेली दिसत नाही.वृत्तपत्रे ही आधुनिकतेकडे तर वळाली, पण त्यामुळे त्यांचे व्यापारिकरणही झाले. घटनांचे विकृतीकरण, सनसनाटीकरण करण्याची प्रवृत्ती हळूहळू वाढत गेली. काही घटना प्रत्यक्षात आहे त्यापेक्षा अधिक मोठ्या रंगवून व भपकेबाजी करुन दाखवण्यात येतात. आजच्या पत्रकारितेत अनामता व एकरूपता यांचे पालन कुठेही दिसत नाही.  माध्यमांत व्यक्तिगत पूर्वग्रहांना कुठेही जागा असु नये. मात्र गेल्या काही वर्षांत पत्रकारितेच्या उत्तरदायित्वाची अंगे पुसट झालेली दिसतात.

           आता मागील महिन्यात एप्रिलच्या सुरुवातीलाच दिल्लीत तबलिगींची जी घटना घडली,त्यात माध्यमं तबलिगींवर जे भार टाकत होतं, ते सर्व ठरवून होत होतं. जमातवाल्यांना Target करण्याची संधी अंध धर्मांधांना चांगलीच मिळाली होती.माध्यमं सारखी तीच ती बातमी दाखवत होते, त्यामुळे समाजात विषमता व द्वेषमुलक भावना पसरली गेली. त्यानंतर थोड्याच दिवसांत घडलेली पालघरची घटना - तेथे एका साधुवर Mob lynching चा प्रसंग ओढवला. मात्र या घटनेला देखील धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न जाणूनबुजून केला गेला. जमावाला रोखणं किंवा थांबवणं हे प्रत्यक्षात मुश्किलीचंच आहे. खरेतर पालघरच्या त्या गावात एकही मुस्लिम घर नव्हतं. दुसर्‍या बाजूला उत्तर प्रदेशात गोहत्येच्या नावाखाली अनेक दलित व अल्पसंख्याकांवर Mob Lynching च्या घटना झाल्या, मात्र त्याविषयी माध्यमांमध्ये एवढे बोलले गेले नाही. एक Super fast Bulletin News दोन - पाच मिनिटं दाखवून विषय बंद करण्यात आला .येथे पालघर आणि युपीमधील घटना सारखीच आहे, मात्र त्याचं Presentation कसं वेगळ्या पद्धतीने केलं जातंय हे आपण लक्षात घ्यायला हवं. 

        पत्रकाराची भूमिका समाजातल्या शेवटच्या तळाच्या माणसाशी असायला हवी. पत्रकारांच्या भूमिकेचं Parameter म्हणजेच आचारसंहिता हे संविधान आहे. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये  जातीयवाद, धार्मिकवाद यांसारख्या मागासलेल्या विचारांशी लढा देण्यासाठी व दारिद्र्य आणि इतर सामाजिक दुष्परिणामांबद्दल लोकांना मदत करण्याची माध्यमांची मोठी जबाबदारी आहे. म्हणूनच पत्रकारितेचे नीतिशास्त्र जागोजागी असणे फार महत्त्वाचे आहे. माध्यमांशिवाय लोकशाही म्हणजे चाकं नसलेल्या वाहनासारखं आहे. मात्र आजच्या लोकशाहीत या चाकांनाच नियंत्रित करण्याचं काम केलं जातंय. सत्य, प्रामाणिकपणा, अचूकता, पारदर्शकता, स्वातंत्र्य, निपक्षपातीपणा आणि जबाबदारी या मूलभूत तत्वांवर माध्यमांनी चिकटणे महत्त्वाचे आहे. 

        एक सजग व कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून आपली स्वतंत्र भूमिका या लोकशाहीत असणं तेवढंच गरजेचं आहे ."Medium is the Message " हे सुत्र संवादशास्त्राचे महापंडित 'मॅकलुहान' यांनी मांडले होते. त्यांचे मत होते की, वातावरणात होणारे बदल हे माध्यमांमुळे होतात. माध्यमं ही आता सर्व सामान्य माणसाच्या जीवनातील अपरिहार्य भाग झाली आहे. आणि त्यांचं Controlling ही सर्व सामान्यांनीच करायला हवं. 
                   
निकिता चंद्रकला दादाभाई

2 comments:

VILAS ADAKMOL Korpawali said...

खूपच छान .. अप्रतिम शब्द रचना आणि विचार

Anonymous said...

Great

सत्यमेव जयते फार्मर कप प्रशिक्षण एप्रिल २०२२  सत्यमेव जयते फार्मर कप प्रशिक्षण समृद्ध गाव स्पर्धेअंतर्गत पानी फाउंडेशनच्या चळवळीतील ३९ तालुक...