Wednesday, 28 April 2021

रचनात्मक भेदभाव

          सुशिक्षित, कर्तबगार मुलगी म्हणजे एक संस्कारसंपन्न सृजनशील व्यक्ती नसून, एक उल्केसारखी वस्तू असते. एकदा चमकली नंतर नाहीशी झाली. म्हणजेच दरवर्षी दहावी - बारावीला Top करणाऱ्या पोरी काॅलेजमध्ये देखील नेहमी अव्वल राहणाऱ्या पोरी नंतर अशा उल्केसारख्या कुठं गायब होतात बरं ?मला अचानक पडलेला प्रश्न, यावर विचार करताना मला काही गोष्टींचा मागोवा घेता आला. 

         आजही या Structural Society मधील मोठ्या प्रमाणातील मुली एक Nominal Degree Complete करून लग्नाच्या बंधनात बांधल्या जातात. त्यांच्याकडे जरी त्यांची ध्येय - स्वप्न काबीज करणारी बुध्दीमत्ता असली,‌ तरी त्या ती करण्यास आपली समर्थता दाखवण्यात हतबल ठरतात. Primary, Highschool ते College पर्यंतच्या मैत्रिणी Degree  पूर्ण होईपर्यंत त्यांची मोठ्या प्रमाणात गळती झालेली असते. 

         पुरुषाला पत्नी म्हणून स्वतंत्र विचारांची नव्हे, तर सुशील स्त्रीच हवी असते. आपल्या परिवाराला सांभाळणारी, आई-बाबांची देखभाल करणारी. नवरा म्हणून आपली काळजी करणारी व आपल्याला सगळं आयतं हातात देणारी. परंपरागत रुढी परंपरेच्या साच्यात बसणारी सुसंस्कृत अशीच बायको त्यालाही हवी असते. 

         मुलींनी नोकरी करावी, पैसे कमवावे इथपर्यंत ठीक आहे. पण त्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि कुटुंबाशी निष्ठा याच्या आड नोकरी कधीही येता कामा नये. समाजाचा हा विषमतावादी पगडा बाईच्या प्रगतीतील खरा अडथळा ठरतो. या सगळ्यांमुळे बाई मानसिक भार (Mental Load ) च्या Phase मधून वावरत असते. आणि तिच्या मानसिक आजाराविषयी कुणी तिला नखाबरोबरही विचारत नाही. मात्र बाईची सहन क्षमता प्रचंड असते, ती पुरुषांकरवी सर्व बोल पचवून घेत असते. सारी अक्षम्य वागणूक रिचवून घेत असते. एक शब्दही उलट न उगारता. पुरुष वाट्टेल तसं बोलेल, त्याचा पुरुषार्थ सिद्ध करण्यासाठी मनमर्जी नुसार वागेल, मात्र बाईला काही बोलायचा काडीमात्र अधिकार नाही. नाही तर मग पुन्हा तिच्या संस्कारांवर बोट आलाच समजा. विरोध सहन करणं किंवा त्याविरोधात आवाज उठवणं या दोन्हीमध्ये तिची मानसिक कोंडी अटळ असते. 

          जागतिकीकरणामुळे आपण खूप आधुनिक झालो. आपलं राहणीमान, कपडे, खाद्यपदार्थ, ब्रॅंडेड चीजवस्तू वापरणं, चालणं, फिरणं, झोपणं, बोलणं अगदी सगळ्यांचं पैलूंतून आपण आधुनिक होतोय. मात्र विचारांच्या बाबतीत अजूनही आपला वैचारिक विकास मागासलेलाच आहे. आजही विद्यादानाच्या बाबतीत मुलींचा जीवनपट बहुधा लग्नाच्या उंबरठ्यापर्यंतच येऊन पोहचतो.

          चंदन देखील स्वतः झिजून दुसर्यांना सुगंध देते. परंतु त्याच्या रक्षणासाठी हजारो नागांचा फणा असतो. तसेच स्त्रियांचेही असते. "खाउजा" च्या आगमनानंतर व विज्ञान - तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे काळ बदलला. सुधारकांच्या सौजन्याने वातावरणही थोडे बदलले. पुरुषांबरोबर स्त्रिया शिक्षीत होत आहे. त्यांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात कर्तब दाखवत आहे. आजची स्त्री मिळवती झाली / कमावती झाली. पण तिने नेमकं काय मिळवलं? घरचे आणि बाहेरचे काम दोन्ही तिच्याच हाती आले. रुढी आणि परंपरा यांच ओझंही कदाचित तसुभर फरक पडता होत तसंच राहिलं. आजच्या काळात जरी खूप काही बदलले असले, तरी स्त्रियांची स्थिती मात्र बदलली नाही. ना सुरक्षित, ना स्वरक्षित अशीच तिची परिस्थिती आजही आहे. 

- निकीता चंद्रकला दादाभाई

3 comments:

Unknown said...

बऱ्याच वेळा नवरा सोबत देऊन सुद्धा बायका आपल्याला त्यांचा सुसंस्कृत साच्यात बसतील याप्रमाणे वागून जातात. नवरा साथ देत असताना त्या एका बंधनात स्वतःला अडकवून घेतात... यात बायकांनी याही पुढे जाऊन विचार करणें गरजेचे आहे....


छान लेख लिहालाईस....😊

Unknown said...

💯

Unknown said...

Very well nikki keep write blogs

सत्यमेव जयते फार्मर कप प्रशिक्षण एप्रिल २०२२  सत्यमेव जयते फार्मर कप प्रशिक्षण समृद्ध गाव स्पर्धेअंतर्गत पानी फाउंडेशनच्या चळवळीतील ३९ तालुक...