TROLLING
सध्या सोशल मीडियावर सोनु सुद व अजय देवगणला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातंय. सोनु सुदला 'सुर्यवंशम' सिनेमातील बस सोबत दाखवून त्याची प्रतिमा Real Hero सारखी Present करण्यात येतेय, तर अजय देवगणला 'विमल व गुटख्यासोबत दाखवून त्यावर टीकाटिप्पणीचे ताशेरे ओढण्यात येत आहे. यात दोन्ही अभिनेते या कोरोना काळात जे काम करताय त्यात त्यांचा हेतू समान आहे, आपल्या परीने शक्य ती मदत समाजाला करणे. यात अजयने 51 लाख रुपयांची मदत केली, तर सोनु सुद हा प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून अडकलेल्या लोकांना घरी जाण्यास सहाय्य करतोय. यात ते दोघं Real Life मध्ये त्यांचा Role Play करताय, कुठेही गाजावाजा न करता मात्र, तरी देखील ते ट्रोल केले जाताय.
"काय म्हणशील ज्ञानदा " म्हणत, ABP Maza Anchor ज्ञानदालाही सोशल मीडियात खूप ट्रोल केले गेले., फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना देखील माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी असल्यामुळे सोशल मीडियावर ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. एवढेच नव्हे तर सध्या स्वतः फडणवीसांनाच मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे,
यावरून आपल्या हे लक्षात येईल की, ट्रोल हे अगदी कुणालाही, चांगल्या - वाईट बाबींवरून सहज करता येतं मग काय असतं हो, हे "TROLLING" नेमकं? जे राजकारण्यांपासून, सत्ताधारी - विरोधक असे होत, Celebrities, साहित्यिक, लेखक, कार्यकर्ते, ते सर्वसामान्यांपर्यंत .... असे अगदी सहज कोणासही Troll केले जाते. या Trolling कडे जरा आपण एक कटाक्ष टाकुया.
Trolling हे शारिरिक व्यंग, नाव, आडनाव, जात, धर्म, लिंग, पद ... यांसारख्या अगदी आपल्या दैनंदिन आयुष्यातील लहान - सहान बाबींवरून देखील Troll केले जाते. वरील बाबींना अनुसरून जोक करणे, अश्लाघ्य शब्दांत Comments करणे, अपमानास्पद Joke Viral करणे, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, अश्लील बोलणं, अगदी आपलं मनोधैर्य खच्ची होईल अशी टिप्पणी करणे,....म्हणजेच Trolling होय.
जाणकारांच्या मते, भारतात ट्रोलिंगची सुरुवात 2010 मध्ये झाली. व 2013 मध्ये सोशल मीडियावरिल संघटीत ट्रोलिंग सुरू झालं. तोपर्यंत ते Website वरील बातम्यांची Comment Section मध्ये अर्वाच्य भाषेत Comment करणं किंवा ती बातमी चुकीची ठरवण्याचे प्रयत्न करणे, किंवा स्वतः चा अजेंडा रेटण्यापर्यंत मर्यादित होतं. ट्रोलिंग हे डावे - उजवे कोणत्याही गटाकडून होत असते. मात्र, माध्यमातील जाणकारांच्या मते, उजव्या विचारांची (Right Wing) मंडळी यात पुढे आहे. संघटीत ट्रोल करणार्या लोकांना त्यांच्या - त्यांच्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा असतो. हे त्याशिवाय शक्य होत नाही.
लोकांवर ट्रोलिंग हे डेटानुसार होतं. जर राजकीय पक्ष कुणाला त्याचं कंत्राट देत असतील , तर त्याची माहिती सार्वजनिक केली गेली पाहिजे. तसंच लोकांचा जो डेटा वेगवेगळ्या पद्धतीने गोळा केला जातो. तो Delete करण्याचा अधिकार त्यांना देणारा कायदा केला जाणं गरजेचं आहे. असे मत सोशल मीडिया जाणकार - निखील पाहावा नोंदवतात.
ट्रोलिंग हा सध्या सर्वसामान्यपणे उद्योग झालेला दिसतोय. ट्रोलिंगसाठी आता पैसे मिळतात., संघटीत ट्रोल्सला विकत घेतलं जातं. साधारण एका Tweet साठी 10 ते 100 रूपये मोजले जातात. यामुळे ट्रोलिंग करणार्यांना अधिकच वाव मिळतोय. आणि म्हणूनच दिवसागणिक या ट्रोलधाऱ्यांच्या संख्येत भर पडत चाललीय. आता तर रीतसर Trolling च्या Agency आहेत.
लोकं ट्रोल का करतात? हा एक महत्त्वाचा प्रश्न येथे डोकावतो. याची प्रामुख्याने तीन ते चार कारणं निदर्शनास येतात. :
- एखाद्याला हैराण करण्यासाठी
- लक्ष वेधून घेण्यासाठी, म्हणजेच Publicity साठी
- इतरांना त्रास देण्यासाठी
- ट्रोलच्या माध्यमातून प्रसिद्ध होण्याची नशासुध्दा लोकांमध्ये काहीवेळा असते.
Trollers समाजमाध्यमांना लागलेली कीड आहे. दुसर्याच्या जीवनावर शहानिशा करणे, खाजगी आयुष्यावर अतिक्रमण करण्याचं काम हे Trollers करतात. याचच एक ताजं उदाहरण म्हणजे : 'सफुरा जरगर' ही जामिया मिलीया इस्लामिया ची M - Phil ची विद्यार्थीनी, तिला ,CAA ( Citizen Amendment Act) च्या विरोधात आंदोलक म्हणून उत्तर - पूर्व दिल्लीच्या जाफराबाद येथून UAPA (Anti Terror act - Unlawful Activity Prevention Act) च्या अंतर्गत अटक करण्यात आली. तिला ज्या निदर्शनांखाली अटक केली गेली, ती निदर्शने फेब्रुवारी महिन्यात झाली होती. आणि तिला अटक ही मार्चच्या शेवटच्या आठवड्यात करण्यात आले. म्हणजेच ,Lock Down सुरू झाल्यानंतर. तिला दिल्लीच्या तिहार तुरुंगात Quarantine Prisons मध्ये ठेवण्यात आले आहे. Corona Quarantine Test करत असताना, ती गर्भवती आहे अशी अफवा उठवण्यात आली. व समाजमाध्यमांमध्ये तिला सर्वत्र ट्रोल करण्यात आले.यात महत्त्वाचे म्हणजे तिला Quarantine Period मध्ये अटक करण्यात आली, दुसरं म्हणजे रमजानच्या पाक महिन्यातही तिला बेल दिली गेली नाही., किंवा मिळू शकली नाही. आणि आता तिच्यावर होणारं हे ट्रोलधाडीचं सत्र ..
खरेतर ट्रोल कुणीही होऊ शकतं. "Everybody is TROLL" आता जे टोळधाड शेतकर्यांच्या जीवावर उठलंय. अगदी या टोळधाडीचंच काम हे Trollers करतात. Trollers हे कुणाचं सामाजिक, राजकीय चारित्र्य हननही करु शकतात. किंवा ज्याची त्यांनी सुपारी घेतलीय, त्याचे गुणगान, गोडवे गात, नसलेल्या गुणांचं अतिरिक्त प्रदर्शन करून त्यांना नेताही बनवलं जातं. ट्रोलिंगची Army वेगवेगळ्या विषयांवर सतत कार्यरत असते. व्यंगचित्रे, विविध Jokes, Comments, यांच्या माध्यमातून सामान्यपणे Troll केलं जातं.
या ट्रोलिंगवर काय उपाय असू शकतात तर, ते म्हणजे : ट्रोल करणार्यांना प्रत्युत्तर न देणे व दुर्लक्ष करणे. शक्य झाल्यास त्यांना Block करणे, आपण Target होऊ अशा पोस्ट शक्य असल्यास टाळणे. मात्र, जर Trollers चा अतिरेक वाढत असेल तर Social media platform आणि पोलिसांत त्यांची तक्रार दाखल करावी.
ट्रोल करणारी व्यक्ती ही स्वतःला तर्कशास्त्रात व वादविवादात तज्ञ समजून असतात. समालोचनात्मक टिका टिप्पणी करण्यात जणु त्यांना रसच असतो. ISTRO चं मंगळयान शेवटच्या टप्प्यावर असफल ठरलं तरी ट्रोलिंगचा विषय ठरतं, एखादं बिल पास झालं तरी ट्रोल होतं, सिंधु - सायनाच्या यशापयशावर टीकाटिप्पणी, क्रिकेटच्या खेळाडूंवर - सामन्यांवर ट्रोलिंग, पद्मावत - पानिपत सारख्या चित्रपटांवर ट्रोलिंग, महिलेच्या कपड्यांवर - खाजगी आयुष्यावर ट्रोलिंग, सिनेक्षेत्र, नाटयक्षेत्र, संसद, प्रशासन, पत्रकार - मीडिया आंदोलने - कार्यकर्ते .... अगदी सर्वांना बेमालूमपणे ट्रोल केलं जातंय. यावर शासनाचा वचक असणे गरजेचे आहे. आपली मनोवृत्ती खच्चीकरण करणार्या Trollers विरुद्ध कायदा होणं आता आवश्यक झालंय.
निकीता चंद्रकला दादाभाई